
महाराष्ट्रातील बदलत्या व घडणाऱ्या घडामोडीत महाराष्ट्राच्या सुसंकृत राजकारणाला एक एक हादरा बसत आहे. महाराष्ट्रात राजकारणाची हि व्यवस्था सरंजामशाही याआधी नव्हती का?
वेगवेगळ्या प्रश्नावर वेगवेगळे समाज एकत्र येत आहेत स्वतःच्या प्रश्नाबाबत 2024 पूर्वी समाजाचे मत ठेवत आहेत त्याचा नक्की फायदा समाजाला होईल कि राजकारण्यांना हा येणारा काळ निश्चित करेल.
लोकशाही मध्ये कोणताही पक्ष हा कायम सत्ताधीश नसतो. या देशाने 70 वर्षे काँग्रेसचा काळ पाहिला. जे या काळात मुस्लिमांचे प्रश्न होते मुस्लिमांसमोर समस्या होत्या त्या त्याकाळी छुप्या होत्या त्या आत्ता उघड आहेत.
उघडरित्या मुस्लिमांविरोधात उघड राजकीय प्रेरित घटना घडत असताना मुस्लिम समाज स्वतःची अशी भूमिका मांडू शकत नाही.
मुस्लिमांच्या स्थानिक प्रश्नावर वेगवेगळ्या पक्षात असलेले अल्पसंख्याक सेल एकत्र येऊ शकत नाहीत.
सध्याच्या पक्ष फुटीने तर अजून नवीन नवीन अल्पसंख्यांक सेल जन्माला घातली.
या विधानसभेला महाराष्ट्रातील दहा आमदार मुस्लिम समाजाचे आहेत.
येणारा काळ कठीण असणार आहे त्या दृष्टीने मुस्लिम समाजात राजकीय समज आणि राजकीय दबावगट कितपत निर्माण होतो हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात या परिस्थितीत काम करण्यासाठी कितपत संशोधने झाली? राजकीय चर्चा मुस्लिम समाजातून किती झाल्या? मुस्लिम समाजाला एखाद्या मतदार संघात असलेले आपले राजकीय प्रतिनिधित्व किंवा राजकीय बळ याबाबत माहिती आहे?एकीकडे राजकीय नेते यांच्या भूमिका बदलत असताना एखाद्या मतदार संघात मुस्लिम समाजाची राजकीय ताकद शक्ती याबाबत कितपत विचार विनिमय होईल?
महाराष्ट्रातील मुस्लीम समाज अजूनही वेगळ्या मानसिकतेत जगतो आहे. एकीकडे मुस्लीम समाजाचे सांस्कृतिक हनन होत असताना राजकीय दृष्ट्या तो सरंजाम शाही नेत्यांवर विसंबून आहे.
मुसलमानांच्या राजकिय , सामजिक, आर्थिक दृष्ट्या मजबुती करणाचे कोणालाही सोयरसुतक नाही. राजकिय पक्षाशी जोडलेला कोणताही वर्ग असो किंवा व्यक्ती असो तो समाजाच्या दृष्टीने स्वतःच्या पक्षापुढे राजकिय अजेंडा ठेवताना दिसत नाही.
मुस्लीम समाजाची वोट बँक एकीकडे नाकारली जात आहे किंवा तीचे महत्व कमी केले जात आहे . कधीही मतदान न विकणारा हा समाज कसबा निवडणुकीत सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पैसे घेताना पाहिला.
हे कशामुळे घडले? समाजातील जे नेते आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी इतके खालच्या स्तराला चापलुसी बाबत जातात की त्याला सीमा नसते.
येणाऱ्या काळात मुंबई पुणे सारख्या महानगर पालिका तसेच येत्या वर्षात होणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुका या दृष्टीने मुस्लीम समाजाने मोट बांधली पाहिजे.
प्रादेशिक अस्मिता, स्थानिक संस्कृती यात मुस्लीम समाजाला , त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांना कोठेही स्थान नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.
We have to focus on Education & economy of our community
Yes yeh zaroori hai kisi aur ko ilzam dene mein fayeda nahi.
मुस्लिम समाजाला स्वार्थ सोडून निष्पक्ष होऊन एकत्रित येऊन संघटित होऊन शैक्षणिक, आर्थिक, व राजकीय शेत्रात काम करावं लागणार आहे.
Yes yeh zaroori hai kisi aur ko ilzam dene mein fayeda nahi.