पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे पक्षांतर आणि मुस्लिम समाजावर होणारा परिणाम

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यातील राजकारण महाराष्ट्राच्या नेहमी केंद्रस्थानी राहीले. पश्चिम महाराष्ट्राच्या पेक्षा विदर्भ – मराठवाडा भागात निजामाच्या राज्याची असलेली पार्श्वभूमी व मुस्लिम बहुल भाग यामुळे हिंदू मुस्लिम विभागणी करणे महाराष्ट्रातील मराठवाड्यात अगदी सहज आणि सोप्पे झाले. ते पश्चिम महाराष्ट्रात आत्तापर्यंत करता आले नव्हते कारण…

तशी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात कधीही नव्हती. पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान मराठी या संस्कृतीशी एवढा गुंतला आणि मिसळला होता की त्याच्या डोक्यावर असलेली दाढी टोपी कधीही परकी वाटली नव्हती. किंवा त्याचे एक ईश्वरवादी असणे केव्हाही बोचत नव्हते.

पश्चिम महाराष्ट्रातील ध्रुवीकरणाला सुरवात झाली ती सांगली जिल्ह्यातून त्यांचे पडसाद उमटायला लागले ते सांगलीला लागून असलेल्या आसपासच्या इचलकरंजी, कराड, कोल्हापूर शहरात . यासाठी कसे काम केले गेले सांगायला नको.

जयंत पाटील राष्ट्रवादीचे, पतंगराव कदम काँग्रेसचे, उदयनराजे तर साक्षात राजे या भावनेतून येथील मुसलमान नेहमी स्वतःच्या समाजाच्या राजकीय चळवळी, संगठना बांधणी यापासून दूरच राहिला. जरी शाफुआ विचारांशी बांधील असल्याचे सांगणारी हि मंडळी मुस्लिमांच्या विरोधात विष ओकणाऱ्या मंडळीच्याबाबतीत असलेले संबध याचा परिणाम सांगली, कोल्हापूर, सातारा या सिमाभागाची ओळख ‘दंगलीचा टापू ‘ म्हणून होण्यासाठी जबाबदार आहे? हे कसे पाहणे गरजेचे आहे?

माण, खटाव, फलटण सारख्या तालुक्यातील मुस्लिम समाज नेहमी जयकुमार गोरे, निंबाळकर घराणे यांच्या मागे मुस्लिम समाज आपली माणसे म्हणून उभा राहिला.
नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर दुष्काळी भागात महेश शिंदे सारखे भाजपचे आमदार निवडून आलेही पण पुसेसावळी सारख्या ग्रामीण भागात भयंकर दंगलीचे रूप पहावे लागले.
रामराजे ,अजित दादा हे समावेशक असले तरी राष्ट्रवादीत असलेली जातीय धार्मिक मानसिकता असलेली भिडे गुरुजी, एकबोटे यांची अनुयायी असणारे यांची कुचंबना बळेच ‘ आम्ही शाफुआ वादी ‘ अशी राहणार नाही.

गटाकडे असले ते सर्वसमावेशक नेतृत्व असले तरी त्यांचा आगोदरच जातीय असलेला कार्यकर्ता हा उघड होणार आहे हे नक्की.

एकीकडे राजकीय पक्षांतर आणि त्यांच्या मागे असणारा राजकीय कार्यक्षेत्रात वाढत चाललेला जातीय वाद धर्मवाद टोकाचा झालेला दिसेल. विखे पाटील काँग्रेसचे पण भाजपात गेल्यानंतर अहमदनगरची राजकीय परिस्थिती बदलली तशी सामाजिक सलोख्याची देखील बदलली. विखे पाटील नसतील तसे वाटत पण अहमदनगर मधील गुहा येथील प्रकरण, उंबरे प्रकरण याची झळ ग्रामीण भागातील मुस्लिमांना खूप मोठ्या प्रमाणावर बसली आहे.

पुणे हे हिंदुत्ववाद्यांच महत्वाचं केडर त्यांनतर बारामती असं खाजगीत बोलल जात.एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण पुणे जिल्ह्यात बहुतांश वातावरण येवढं गढूळ झालं नाही. हर्षवर्धन पाटलांच्या जाण्याने इंदापूरच्या ग्रामीण भागात बदलेल्या परिस्थितीचा परिणाम पाटील जरी चांगले असले तरी आजूबाजूला काय घडत आहे हे मुस्लिम समाजाला अनुभवास येत आहे. इंदापूर तालुक्यातील भरणे विरुद्ध पाटील या राजकीय लढ्याला धनगर आणि मराठा मतदारांच्या केंद्रीकरणात येथील मुस्लिम समाज निर्णायक भूमिका बजावत होता. आता हर्षवर्धन पाटील आणि भरणे हे जरी एकमेकांचे विरोधक असले तरी बराच बदल घडलेला असेल कारण दोन्ही पक्षांमुळे एकमेकांना पूरक भूमिका घेतील?

जे आगोदरपासून छुपे सरंजाम शाही, जातीय वादी होते ते उद्या नितेश राणे सारखे उघड भाषा करतील त्यासाठी त्यांना राजकीय दृष्ट्या सिध्द करावं लागेल.
समाजवादी पक्ष, वंचित हे जरी समावेशकतेची भाषा बोलत असले तरी त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या वर्गाचे ब्राह्मन्यकरण झाल्याचे त्यांना नाकारता येणार नाही.

एखादा नेता एखाद्या पक्षात गेल्यानंतर किंवा त्याला पाठिंबा दिल्यानंतरही या भागातील मुसलमान नेता चांगला म्हणून नेत्याच्या मागे सक्षमपणे उभे राहतील हि. पण राजकारणाच्या सक्षमतेतून यंत्रणाद्वारे मुस्लिमांचे होणारे सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक दमन रोखू शकतील का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *