
ज्यांना नियतीने खलनायक केले अशी एकूण कारकीर्द असलेले जगातील एकेकाळचे सर्वात श्रीमंत व्यक्ती, जगातील सगळ्यात मोठे दाते असे वर्णन ज्यांचे करावे ते हैद्राबादचे मिर उस्मान अली.
असंख्य मंदिरांना देणग्या दिल्या त्यात यादगीरगुट्टा मंदिर 825,825 रुपये, श्री रामबाग मंदिर 5000 रुपये, भद्राचलम मंदिर 50,000 रुपये आणि तिरुपति वेंकटेश्वर मंदिरासाठी 8,000 रुपये यांचा उल्लेख करावा लागेल.
असंख्य मंदिरांना तसेच महाभारताचे संशोधन यासाठी भांडारकर प्राच्य विद्या संशोधनास देणगी देणारे दानशूर होते .
भारत चीन युद्धाच्यावेळी भारत सरकारला पाच टन सोने संकट काळात दान केले. आजपर्यंत दान करण्याबाबत त्याचा रेकॉर्ड कोणी मोडू शकले नाही.
निजामाचा मृत्यू झाल्यानंतर (तत्कालीन) भारतीय इतिहासातील सर्वात मोठा दफन विधी होता, असे निजाम संग्रहालयाच्या कागदपत्रांत म्हटले आहे. अंदाजे १ कोटी लोक” निजामांच्या गन-कार्टच्या जुलूसमध्ये सामील झाले होते. हे निजामाच्या लोकप्रियतेचे पुरावे म्हणायला हरकत नाही. भारताच्या इतिहासात निजामाचे दफन हा सर्वात मोठा गैर-धार्मिक, बिगर राजकीय प्रसंग होता. शोकाकुल लोकांची संख्या इतकी जास्त होती की हैदराबादचे रस्ते आणि फुटपाथ तुटलेल्या बांगड्यांनी भरले होते. (तेलंगणाच्या परंपरेनुसार, स्त्रिया त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या बांगड्या फोडतात.)
सगळ्यात जास्त मदत करणारे, लोकांसाठी धरणे, रस्ते यासारख्या लोकहितवादी, कल्याणकारी योजना राबवणारे मीर उस्मान अली यांचा आज जन्मदिवस.
भारतीय इतिहासातील हा नायक की खलनायक हा प्रश्न इतिहास नक्कीच विचारेल !