
ज्या वेळी सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा विषय येतो ; तेव्हा 106 हुतात्मे यांचे स्मरण करावेच लागते.
कित्येक जण विचारतात कि मराठी भाषेचा आपण का वापर करता. सांगावस वाटत कि माझ्या ग्रामीण,शहरी भागातील बाहेरुन आणि आतुन मुस्लीम असणारा समाज या भाषेशी नाळ बांधुन आहे.
सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही मुस्लीम समाजाने महाराष्ट्र अस्मिता म्हणून योगदान दिले.
शाहिर अमर शेख जे सोलापुरचे होते ते अवघ्या महाराष्ट्रातील नवयुवकांपर्यंत पोहचले.
पण 106 हुतात्मे यांच्यापैकी तीन नावे फक्त यादीतच दिसली त्यांच्याविषयी विस्तृत लिखाण कुठेच दिसले नाही ते होते..
1-महंमद अली
2-सय्यद कासम
3-मुंंशी वझीर अली
याप्रमाणे गावोगावी स्वातंत्र्य लढ्याचे स्तंभ उभे राहिले…त्यातील स्वातंत्र्य सैनिक सामान्य लोकांपर्यत पोहचू शकले नाहीत.
महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान केलेल्या या हुतात्म्यांची नावे नीट वाचा.सर्व जाती धर्माच्या लोकांनी महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती दिली आहे. हाच खरा महाराष्ट्रधर्म आहे!
धर्म आणि जात यांच्या नावाखाली जो विद्वेष बाळगतो, तो खरा मराठी माणूस नाही हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या संयुक्त शुभेच्छा !