कुरेश मोहल्लयात उभी राहतेय अलिशान शाळा फलटणच्या मुस्लिम बांधवांना आर्थिक मदतीची गरज

सातारा जिल्ह्यातील फलटण हे शहर. पुणे पंढरपूर रस्त्यावर बाणगंगा नदी ओलांडल्यावर उजव्याबाजूला शहराच्या सुरवातीला कुरेशी समाजाची वस्ती. परंपरागत जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय व जोडीला मांस विक्रीचा धंदा.

परंतू महाराष्ट्र शासनाने गो हत्या बंदी केल्यानंतर 2005 नंतर कुरेशी समाजाला हा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर दुभती जनावरे शेतकऱ्यांना खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू राहिला.

हिंदुत्ववादी संघटना तसेच कायदेशीर अज्ञान यामुळे वेळोवेळी कायदेशीर, आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. सतत होणाऱ्या तणावाच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाने कुरेशी समाजाच्या सहमतीने मोहल्ल्यातील जुन्या कत्तलखान्याची इमारत मार्च 2024 मध्ये जमीनदोस्त केली .

समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्यामुळे मोकळ्या झालेल्या जागेवर आगोदर पासून शेजारी सुरू असलेल्या उर्दू शाळेसाठी कुरेशी समाज आणि फलटण तालुक्यातील मुस्लिमांनी शाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा आगळा वेगळा निर्णय घेऊन समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे काम केले आहे.

यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असून मराठी मुसलमान परिवारातर्फे समाजातील सर्व घटकांना मदतीचे आव्हान करत आहोत.

संबंधित माहिती बँक तपशील हे शाळेचे असून बाकी संपर्क अधिक माहितीसाठी आहेत.

आपल्याला आलेली लिंक जास्तीत जास्त शेअर करा व आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा आणि एक नवीन संदेश जगाला द्या आम्ही पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे स्वतःचे अस्तित्व राखेच्या ढिगाऱ्यातून निर्माण करू.

5 thoughts on “कुरेश मोहल्लयात उभी राहतेय अलिशान शाळा फलटणच्या मुस्लिम बांधवांना आर्थिक मदतीची गरज

  1. उर्दू शाळा, इंग्लिश शाळा, निवासी शाळा की हिंदी मिडीयम शाळा नेमकी कोणती शाळा हे स्पषट होत नाहि

  2. खूप प्रेरणादायी , अभिनंदन पात्र उपक्रम, तेथील कुरेशी समाजाने आदर्श घडवला आहे. मला एक सुचवावे वाटते इथं उर्दू बरोबरच सेमी इंग्लिश मराठी माध्यम किंवा इंग्रजी माध्यमाची देखील शाळा सुरू केली पाहिजे किंवा एखादे व्यावसायिक शिक्षण देणारे एखादे युनिट सुरू केले पाहिजे जेणेकरून मुस्लिम व इतर समाजातील मुलांना देखील याचा फायदा होईल.तसेच व्यावसायिक शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी लवकर निर्माण होतील

  3. उर्दू शाळे ऐवजी मराठी शाळा सुरू करणे मुस्लिम मुला करिता जास्त आवश्यक आहे ज्या उर्दू शाळा सुरू आहे त्या 90टक्के मुलांना 12पर्यंत ढकलत ढकलत घेउन जातात आणि त्या पुढे ती मुलं काहीच करतं नाही, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा तर सोडाच साधे पोलिस भरती चे मराठीचे पेपर ही मुल सोडाऊ शकत नाही, ही आमच्या विदर्भातील उर्दू शाळाची गोष्ट आहे म्हणून हा प्रपंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *