बातम्या मानसिकतेवर कशा आघात करतात?

महिला अत्याचारामुळे , बीडच्या मस्साजोग प्रकरण, परभणी मधील आंबेडकरी समाजावरील अन्याय व अमित शहा याच वक्तव्य यामुळे लोकांच्यात असलेला राग हा सर्वसामान्य आहे. लोकांच्यामध्ये असलेली चीड हि प्रशासन, शासन यांच्या विरोधातील आहे.

महिला अत्याचाराचे कारण दाखवत खोने कल्याण येथे शुक्रवारी नमाजासाठी येणाऱ्या मुस्लिमांना मज्जाव केला गेला. गेल्या आठवडाभरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेत एकही मुस्लिम नाही हि गोष्ट वेगळी. मुस्लिम असता तर…..
याच असं झालं की जखम मांडीला मलम गांडीला

दुसरी बातमी

चर्च मधून जाणाऱ्या युवतीवर बलात्कार….
युवतीवर बिर्याणी विक्रेतेचा बलात्कार…
अशी एकच बातमी दोन वेगवेगळ्या हेडिंगने लावली. पहिल्या हेडिंगखाली येणाऱ्या प्रतिक्रीया ख्रिश्चन पदरी विरोधी तर दुसऱ्या हेडिंगच्या बातमी खाली येणाऱ्या प्रतिक्रिया ह्या बिर्याणी विक्रेता या विशेषण यामुळे मुस्लिम विरोधी सुरू झाल्या. पंजाब केसरी वृत्त पत्राने बातमी दिली होती .
सदर आरोपी हिंदू होता. आणि तो बिर्याणी विक्रेता होता.

पुण्यात एका आमदार बाईने भिंतीला दिलेल्या रंगावरून वातावरण तापवण्याचा प्रकार केला. ज्या जागेत हा प्रकार झाला त्या जागा मालकाने श्रद्धेपोटी हा प्रकार केला होता. विशेष हा स्वतः हिंदू होता.
पण बाईने व त्यांच्या चेल्यांनी मुस्लिमांवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही.
महाराष्ट्रातील वर्तमान पत्रांनी देखील बातमीचा मथळा ‘ सदाशिव पेठेत भिंतीला हिरवा रंग आणि हार घातलेला फोटो टाकून सविस्तर माहिती न देता अपूर्ण माहिती दिली.हिरवा रंग दिसताच मुसलमानांनी मनोसक्त शिव्या खाल्ल्या.

शिवाय
-प्राजक्ता माळी प्रेस कॉनफरन्स

जितेंद्र आव्हाड यांनी दाखल केलेले गुन्हे

बिग बॉस सूरज चव्हाण त्याच्या घरावर पाणी मारत. असल्याची बातमी ( अशा फालतू बातम्या)

हा भडीमार आहेच. बिघडलेल्या व्यवस्थेवरून शासनाच्या विरुद्ध नागरिकांमध्ये निर्माण होणारा राग कमी करण्यासाठी.

प्रसारमाध्यमे आणि राजकारण यांच्याकडून मुस्लिमांवर सातत्याने होणारे हल्ले याचे दोन मोठे फायदे आहेत, एक म्हणजे जातिव्यवस्थेत अपमानित झालेला समाज मुस्लिमांशी लढताना आपल्या वेदना आणि नैराश्येचा राग संधी येताच मुस्लिमांवर काढत असतो. हि उलटी गझापुर ​​, पूसेसावळी बाहेर पडत असते ही उलटी थांबवली तर जाती व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल. आणि परभणी, मस्साजोग असे प्रकार करता येणार नाहीत?

दुसरा मोठा फायदा म्हणजे जनतेच्या रडारवर मुस्लिम पेस्ट झाल्यामुळे भांडवलदार देशाची लूट करताना जनतेला दिसत नाही. भांडवलदारांना लुटण्याची सोय करणाऱ्यांना सत्ता मिळवणे सोपे जाते कारण लुटणारे भांडवलदार त्यांच्यासाठी तिजोरी उघडतात.

तुमच्या मेंदूला सतत विषाचा पुरवठा होत असतो, त्यामुळेच लुटारू भांडवलदार माध्यमांमध्ये सतत पैसा गुंतवत असतात, एवढेच नाही तर माध्यमांकडून त्यांच्याविरुद्धचे थोडेसे आव्हानही आता सहन होत नाही, लोकांना सोशल मीडियावर बंदी घातली जात आहे. दररोज याचे पुरावे समोर येतात.

हि सर्व द्वेषपूर्ण मानसिकता थांबवण्यासाठी मुस्लिमांकडे स्वतःची ना मिडिया आहे ना तेवढी मांडणी करणारी अभ्यासपूर्ण मंडळी!

कृपया याचा विचार करा!

One thought on “बातम्या मानसिकतेवर कशा आघात करतात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *