रमजानच्या आगोदर फिरोजभाई यांनी केली आखाती देशातील 900 भारतीय कैद्यांची सुटका

फिरोजभाई मर्चंट हे भारतीय उद्योगपती आहे. आखाती देशात कायदे हे अत्यंत कडक आहेत. या कायद्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यात ज्या आरोपींना दंड ठोठावला अशा आरोपींचा दंड भरून नऊशे कैद्यांची सुटका करण्याचे काम फिरोज मर्चंट यांनी केले आहे.

2008 मध्ये स्थापन झालेल्या फॉरगोटन सोसायटीच्या उपक्रमांतर्गत त्यांनी हे कार्य केले. आखाती देशातील आत्तापर्यंत त्यांनी 20 हजार कैदी मुक्त केले आहेत.

फिरोजभाई मूळचे मुंबई येथील असून त्यांचा सोन्याचा व्यवसाय आहे.

900 कैद्याची मुक्तता त्यांनी अडीच कोटी रुपये खर्च करून केली.

यात बहुसंख्य जण हे गरीब होते ज्यांना दंडाची रक्कम भरता येत नव्हती.

One thought on “रमजानच्या आगोदर फिरोजभाई यांनी केली आखाती देशातील 900 भारतीय कैद्यांची सुटका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *