
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारा येथील निर्माणाधीन बोगदा खचल्यानंतर त्या बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना आपल्या मेहनतीच्या जोरावर बाहेर काढणारा वकील हसन आणि त्याचे इतर सहकारी यांची घरे आज दिल्ली विकास प्राधिकरणाने जमीनदोस्त करून टाकली. कारण पुढे केलं, अनधिकृत बांधकाम! याबाबत प्रतिक्रिया देताना त्याने सांगितले की, “माझे घर मला द्या. मला तुमच्याकडून इतर काहीही बक्षीस नको; हे मी उघडपणाने सांगितले होते”. वकील हसन आणि त्याचा सहकारी मुन्ना कुरेशी यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी पोलिसी अत्याचाराचाही उल्लेख करताना आपल्या मुलाबाळांना मारहाण करण्यात आली, हे उघडपणे सांगितले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वकील हसन आणि मुन्ना कुरेशी यांनी जीवावर उदार होऊन अत्यंत धाडसाने ४१ जणांना खचलेल्या त्या बोगद्यातून बाहेर काढले. ४१ जणांचे जीव वाचवणे, ही किती मोठी गोष्ट आहे ते ज्यांचा जीव वाचला; तेच सांगू शकतील. पण , त्याबद्दल आपण त्यांना काय दिलं. तर ते बिचारे आज फूटपाथवर झोपताहेत.

वकील हसन यांच्या प्रकरणावर भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, “मी खूप दुःखी आहे, त्यांचे घर बेकायदेशीर होते ही वेगळी बाब आहे, त्यांचे एकच घर होते, त्यांनी देशासाठी खूप चांगले काम केले आहे. आमच्यासाठी एलजी सर. आणि मी डीडीएच्या व्हीसीशीही बोललो आहे, पण त्यांचे घर पाडल्यानंतर माहिती मिळाली. त्यांना पीएम हाउसिंग स्कीम अंतर्गत त्यांना घरे दिली जातील.”
अगर देश और संविधान बचाना हो तो सरकार बदलना होगा 🙏
बढिया