
न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटी (NBDSA) ने 3 टीव्ही चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या द्वेषपूर्ण कार्यक्रमांवर कारवाई केली आहे आणि त्यांना दंड आणि व्हिडिओ काढून टाकण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये अँकर अमिश देवगण, अमन चोप्रा आणि सुधीर चौधरी यांच्या शोचा समावेश आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि रामनवमी हिंसाचारावर दाखवलेल्या शोसाठी टाईम्स नाऊ नवभारतला 1 लाख रुपये आणि न्यूज 18 इंडियाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
‘आज तक’ ला देखील असा इशारा देण्यात आला आहे. या तिन्ही चॅनेल्सना ७ दिवसांच्या आत वादग्रस्त व्हिडिओ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हटवण्यास सांगण्यात आले आहे.
एनबीडीएसएचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एके सिक्री यांनी म्हटले आहे की, प्रत्येक आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे.
न्यायमूर्ती सिक्री यांनी समाजात द्वेष पसरवणाऱ्या आणि जातीय सलोखा नष्ट करणाऱ्या तीन टीव्ही चॅनेल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
लक्षात घ्या की “आज तक” टाईम्स ऑफ इंडिया ग्रुप आणि मुकेश अंबानीचा TV18 द्वेष पसरवताना पकडले गेले आहेत.
सध्या लोकांचे प्रश्न महत्वाचे असताना मिडिया मालकाच्या लग्नाच्या गोष्टी सांगण्यात व्यस्त आहे.