
निवडणुकांचा हंगाम आला की अशी अप्रिय घटना घडणार हे निश्चितच होते. यावर लोकांच्या प्रतिक्रिया ह्या येणार कोणी म्हणेल नमाज पाडण्यासाठी रस्ता आहे का? रस्ता अजिबात नाही.
परंतु त्याच उत्तरभारतात कावड यात्रेसाठी एका बाजूने गेले दोन महिने रस्ते बंद होते सततच्या होणाऱ्या त्रासामुळे कदाचित त्याला राग काढावा लागला असावा.
यानिमित्ताने पुन्हा एकदा पोलिसांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले याच दिल्ली पोलिसांना कोर्टाने 2021 मध्ये दिल्ली दंगलीवरील पोलिसांनी केलेला तपास एकांगी आणि हास्यास्पद म्हणून दिल्ली पोलिसांना 25 हजारांचा दंड ठोठावला होता.
याच पोलिसांवर महिला कुस्तीगारांच्या आंदोलनात आंदोलक हाताळताना महिलांना सन्मानदर्शक वागणूक दिली नाही किंवा पुरुष पोलिसांनी महिलांना हात लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला गेला.
वाझे प्रकरणात जर राजकीय स्पर्धा किंवा राजकीय तंटा नसता तर सत्यता बाहेर न येता एखादा मुसलमान कित्येक वर्ष संबंधित प्रकरणात संशयित म्हणून केव्हाच कित्येक वर्ष आत डांबला असता.
गेल्या दोन वर्षापूर्वी लातूरमध्ये एका पोलिस असलेल्या व्यक्तीवर द्वेषपूर्ण पोस्ट शेअर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एक नवीन मॉकड्रिलचा प्रकार पोलीस विभागाकडून सुरू असतो. यामध्ये दशहतवादी हल्ला झाल्यानंतर करावयाच्या गोष्टींची रंगीत तालीम असते. यात दशहतवादी रूप घेतलेल्या व्यक्तीच्या तोंडी मुस्लिम धार्मिक नारे घालण्यात आले. मुस्लिम समाजातून विरोध झाल्यानंतर समाजाची माफी मागण्यात आली.
कोणत्याही धार्मिक सण किंवा कार्याच्या आधी मुस्लिम समाजाच्या लोकांस पोलीस स्टेशनला बोलावून ‘ शांतता कमिटी ‘ च्या नावाखाली गोड शब्दात मुस्लिमांना धमकवण्याचा जो प्रकार प्रकार होतो तो न समजण्याइतपत मुस्लिम समाज अनाडी नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला एक खुले पत्र लिहिले होते, जनतेचा पोलीस दलावरचा विश्वास कमी झाला आहे, पण.. अल्पसंख्याक समुदायाबाबत पोलीस प्रशासनाच्या होणाऱ्या कृतीस त्यांची प्रशासनाबाबत अविश्र्वास याचा होणारा मानसिक परिणाम याचा विचार कुठे तरी व्हावा.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील एका मुस्लिम रिक्षाचालकाला पोलीस जे शब्द वापरत होता त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात फिरत आहे. त्याला कायद्यापेक्षा तो मुसलमान असल्याचा राग काढायचा होता तो त्याच्या शब्दातून तो व्यक्त करत असल्याचे प्रतीत होत होते.
रस्त्यावर नमाज पडणे चुकीचे आहे पण विषय धार्मिक आस्था किंवा आत्मसन्मान याचा येतो. गेले दोन महिने कावड यात्रेच्या नावाखाली जे रस्ते बंद आहेत त्यांच्या संदर्भात कुणीही अशी कृती केली नाही .
तुम्हाला खेळ समजू शकला नाही
दिल्लीत नमाजांना लाथ मारतानाचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर “मोदी है तो मुमकीन है” या टॅगसह व्हायरल होत आहे. हे सर्व विचारपूर्वक आणि जाणूनबुजून केले गेले आहे.पोलीस एक प्यादा आहे.. त्यांनी त्याला निलंबित केले आहे. 3 महिन्यांनंतर ते त्याला दुसऱ्या पोलीस ठाण्यात पोस्ट करतील.इतर अनेक सणांना 10 दिवस रस्ता अडवतो आणि मंडप टाकतो. पण पोलिसांनी कधी लाथ मारली आहे का?इस्लामिक देश मंदिरे बांधतील आणि आम्ही आमच्या देशात नमाज पडणाऱ्याना लाथ मारू, असे होऊ शकत नाही.
संबंधित पोलिसावर कारवाई झाली. काही दिवसांनी तो कामावर रुजू देखील होईल पण भळभळत्या मनाच्या जखमा किंवा पोलिसाच्या मनातील द्वेष कमी होईल.
खूप छान लिहिले सर
खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेले आहे परंतु समाजात दिवसेंदिवस अशा घटना घडत आहे ज्या घटनांचं चित्रीकरण समोर येत आहे त्याच घटना उघडकीस येत आहे काही घटना काळाच्या पडद्याआड होऊन विलुप्त होत आहे व त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही कायद्याचा आधार घेऊन अशा घटनांच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे
Bahut achcha likha hai sar aapane
स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेचे मूल्य इथली व्यवस्था समाजात खोलवर रुजवू शकली नाही ही आपली शोकांतिका.
इतकेच नव्हे तर घटनात्मक मूल्यांपेक्षा धार्मिक बाबींना, कर्मकांडाना अति महत्व दिले गेले.
Bohat Achhe Bohat Sahi Good 👍 Happy Appreciated 👏 Greatest Jobs, Thanks 😊 🙏
सरकार के इरादे सही नहीं है वरना कर्मचारी अपनी हद नहीं पार करते