“पाण्याच्या एका एका थेबां थेंबांचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल ” आदरनिय प्रेषित मुहम्मद स्वल्ल.

पाण्याच्या एका -एका -थेबां -थेंबांचा हिशोब तुम्हाला द्यावाच लागेल ” आदरनिय प्रेषित मुहम्मद स्वल्ल.

” पाणी वाया घालवू नका ; तुम्ही अगदी पाण्याच्या झऱ्या ( नदी, नाल्यां ) च्या काठावर बसलेले का असेना ??” आदरनिय प्रेषित मुहम्मद स्व.सल्लम.
(संदर्भ: :- सुनन ईब्न माझा :- हादिस नं. ४२५)

प्रेषित मुहम्मद स्व सल्लम.सांगतात की , ” जब तुम मे से कोई रोजे से हो तो उसे खजुर से रोजा ईप्तारी करना चाहिए ; अगर ; खजूर ना हो पाऐ तो पानी से रोजा ईप्तारी करें , ईसलिऐ के पानी पाकीजा चिज है “.( हादीस अबु दाउद २३५५).
” २२ मार्च हा जागतिक जल दिन “. दिवस जागतिक पातळीवर पाणी वाचवा दिवस पाळला जातो, जगात सर्वच देशांत रोजा उपवास ठेवणाऱ्यां(रोजदारां)ची संख्या अफाट प्रमाणात वाढलेली आहे. कॅनडा देशात परिस्थिती अशी आहे की २० -२० तासांचे रोजा आहे . उष्ण कटिबंधातील परिस्थिती फार भयंकर आहे, बऱ्याच देशांत पाणी टंचाई निर्माण झाली आहेत , साऊथ आफ्रिका मधील केपटाऊन शहरातील परिस्थिती शोशल मेडीयावर दोन वर्षापासून फार भयानक दाखवतात की केपटाऊन शहरात व आजुबाजुला पाण्याची पातळी खालावली असल्याने शहर व परिसरात पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे, पाण्याच्या टंचाईमुळे कुठे कुठे तर रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारी चे प्रमाणात वाढ झाली असून गरीबांच्या प्रमाणात खुप वाढ झालेली असून तेथील आर्थिक स्थिती फार बिकट होत चालली आहे,
सध्या मध्य पुर्वेकडील देश इस्राएल व पॅलेस्टाईन च्या युध्दात पॅलेस्टाईन देशात लोकांचे अन्न व औषध व पाण्याचे ही अत्यावशक गोष्टींची अत्यंत कमी पडत आहेत , तेथील हाजारोंच्या संख्येने लहान बालक व वयोवृद्ध व्यक्तींना अन्न भेटत नाहीत . काही बालकांना फक्त चिप्स व बिस्किटे खाउन दिवस काढत आहे..फार विस्मयकारक चित्र पाहायला मिळत आहेत..अल जजिरा व सोशल मीडिया वर बघितले तर कितीही कठोरातील व्यक्ती असेल तरी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.. येथिल लहान बाळ गोपाळ, वयोवृद्ध महिला व व्यक्ती एवढं असूनही रमजानुल मुबारक चे संपूर्ण रोजे ठेवत आहेत …फार विदारक परिस्थिती असून सुद्धा. फक्त एका बिस्कीट व चिप्स च्यां एका एका पुड्यावर फक्त. काहींना तर काहीच भेटू नये राहीलंय , काही काही तर फक्त पाण्यांवर रोजे ठेवत आहे. काय ? काय ? करणार परिस्थिती तशीच आहे, तरीही अल्लाह (परमेश्वराच्या )आज्ञेप्रमाणे, अल्लाह ला खुश व राजी खुशी करण्यासाठी फक्त… परंतु तो अल्लाह आहेत …तो तर एक दिवस तर ऐकणाराच आहे…त्याचीच सर्व परीक्षा, सत्व परीक्षा चा काळ चालू आहेत.. लेकीन..ये दिन भी जायेंगें..???
तर पाण्यावर रोजा सेहरी व पाण्यावरच रोजा ईप्तारी ; सेहरी व ईप्तारी आणण्यासाठी साठी पैसा नाही, काही गरीब लोकांना दोन वेळा पुरेसे येवढंव अन्न नाहीत ,फार हालाखीची परिस्थिती उद्भवली आहे उद्भवत आहेत .
काही ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तर काही ठिकाणी नाहीत..
अशा गरीबीत राहण्याऱ्या रोजदारांची संख्या जास्त असल्याने अशांसाठी प्रेषित मुहम्मद स्व सल्लम सांगतात की ” रोजा ईप्तारीसाठी खजुर नसेल तर तुम्ही पाण्याने रोजा ईप्तारी करावं. कारण पाणी हे पाकीजा ( पवित्र) आहे.” खरोखरच पाणी पवित्र जल आहे.
जगाच्या प्रत्येक जीवाला अन्नधान्या बरोबर पाण्याची फार गरज असते.
प्रत्येक सजीवांच्या निर्मितीचे मुख्य स्त्रोत पाणी आहेत.
पवित्र कुरआन म्हणतो की,” आणि प्रत्येक सजीवाला आम्ही पाण्यापासून निर्माण केले आहे ; काय ते ( आमच्या निर्मितीस ) मानत नाही ?.( सुराह अल – आंबिया आ.नं.३०).
सध्या आधुनिक तंत्रज्ञानाने हे सिद्ध झाले की ,पेशीद्रव्य ( सायटोप्लाझम cytoplasm) जे कोषा ( सेल cell) चे मुलभूत घटक आहे त्यामधे अंशी ८०% टक्के पाणी असते.बहुतेक सजीवांच्या निर्मितीच्या ५०% ते ९०% टक्के पाणी आढळले आहेत व प्रत्येक जैविक घटकांस जगण्यासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. परंतु पवित्र कुरआन मधे हे चौदाशे वर्षापूर्वी दाखवून दिले आहे की प्रत्येक जीव हे पाण्याद्वारे बनले व विज्ञानाने एकोणिसाव्या शतकात सिद्ध करून सांगितले ..असो.
जगाच्या पाठीवर बराचसा भाग हा उष्ण कटिबंधात व काही ऋतुचक्र ऋतुमान सतत बदलत असल्याने वेळेवर पाऊस पडत नाहीत. त्यामुळे त्या भागात जंगलाचं प्रमाणात कमी झालेली असुन , जंगलं ओसाड पडत आहेत. जंगलांचे संरक्षण करणं फार गरजेचे आहे . अगर जंगल नसतील तर पाउस पडणार नाहीं व पाउस पडला नाही तर पृथ्वीच्या तापमानात सहाजिकच आपोआप वाढ होणारच .
शास्त्रज्ञ सांगतात की पृथ्वीच्या तापमानात पुढील दहा वर्षांत आज पासून ४ चार डिग्री ने जास्त तापमानात वाढ होणार आहे.हिमालयातील ग्लेशियर फार मोठ्ठ्या प्रमाणात वितळत आहेत त्यामुळे वैश्विक पातळीवर तापमान वृध्दी ( ग्लोबल वारमिंग (Global warming) होत चाललीये.
ग्लोबल वॉर्मिग रोखण्यासाठी प्रत्येकालाच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मग त्यासाठी (१) जेवढं शक्य आहे तेवढे अधिक प्रमाणात झाडे लावली पाहिजेत ..मोठं मोठ्याली झाडं लावणं गरजेचं आहे.(२) अधिक प्रमाणात जल( पाणी ) वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे..(३) पॉलिथीन चा उपयोग करू नाहीत व प्लॅस्टिक बिलकुल जाळू नयेत त्यामुळे वायु प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होईल.
पाण्याच्या वापराबाबत प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी चौदाशे वर्षापूर्वीच सांगितले होते की व भविष्यावाणी केलेली होती , भविष्याच्या गरजेनुसार व पाण्याच्या तीव्र टंचाईची समस्या निर्माण होण्याच्या दृष्टीने – भितीने फार तीव्र स्वरूपाच्या भावना आपल्या अनुयायायी जवळ तळमळीने व्यक्त केल्या आहेत ;
आदरनिय हजरत प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांचे कथन आहे की , “पाणी वाचवा,पाणी वाया घालवू नका; तुम्ही अगदी पाण्याच्या झऱ्या ( नदी नाल्यां तळ्याच्या) काठावर जरी बसलेले असतील तरी ही ” ( संदर्भ :- सुनन ईब्ने माझा हादिस नंबर:- ४२५).

                     पाण्याची कमतरता वर पुन्हा - पुन्हा , आदरनिय प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम. सांगतात की , " तुम्ही पाण्याचा  वापर काटकसरीने करा . उद्या तुम्हाला कयामत( प्रलयंकारी)च्या दिवसी पाण्याच्या एका -एका थेंबाचा तुम्हाला हिशोब -जाब द्यावा लागणार आहे."
 सध्याच्या जगात चालू असलेल्या " पाणी आडवा  पाणी जिरवा पाण्याचा काटकसरीने वापर करा " या चांगल्या कामाची सुरुवात अपण आपल्या स्वतःच्या घरातुनच सुरू करावेत."

पुष्कळ प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती, जलसंपदा , जलसंधारण – निसर्ग सौंदर्य व संवर्धन वाढविण्यासाठी प्रयत्न करा … माझा परीवारातील सदस्य आवर्जुन हे काम खूप वर्षां पासून करत आहेत आणि आम्ही निर्सगाच्या सान्निध्यात कायम जाउन संवर्धनाचे काम करत असतो.
” जल है तो कल है.”!
म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. सक्ती ने सांगतात ” पाणी वाया घालवू नका; अगर तुम्ही अगदी पाण्याच्या झऱ्यां ( नदी नाले ओढे) च्यां काठांवर बसलेले का ? असेना ?”.

( मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा )
लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर ,
9271640014.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *