
आजच्या दिवशी झालेली बद्र ची लढाई मुस्लिम जगतासाठी महत्वाची लढाई होती. या एका बाजूला लढाईत ज्यांनी इस्लाम स्वीकारला होता त्यांच्या संपत्तीवर कब्जा करून समृद्ध झालेले कुरैश होते. जे त्या संपत्तीच्या आधारे बलदंड झाले होते त्यांच्याकडे भरपूर उंट व घोडे व लढाईचे सामान होते. बद्र मध्ये मदिना वासीय इमानवंत कुरेश यांच्याकडे 313 सैन्य,70 उंट, 3 घोड़े, 8 तलवारी आणि 6 चिलखती होत्या तर
विरोधकांकडे म्हणजे मक्कावासिय कुरेशी यांच्याकडे 1000 सैन्य,700 उंट, 100 घोड़े, 950 तलवारी और 950 चिलखती होत्या.
इस्लामचा आदर आणि सन्मानाचा ध्वज इतका उंच झाला की अश्रद्धावंत- अन्यायी कुरैशांचा सन्मान आणि वैभव पूर्णपणे नष्ट झाले.
313 श्रद्धावंत मुस्लिमांचे ते सैन्य ज्याने 1000 अश्रद्धावंत- अन्यायी सैनिकांच्या सैन्याचा पराभव केला आणि विजय मिळवला! ‘बद्र’ हे मदिना मुनाव्वरापासून ऐंशी मैलांवर असलेल्या गावाचे नाव आहे. जिथे अज्ञानाच्या काळात वार्षिक जत्रा भरत असे. इथे एक विहीरही होती जिच्या मालकाचे नाव ‘बद्र’ होते. यानंतर या ठिकाणाला ‘बद्र’ असे नाव पडले. याच ठिकाणी बद्रची कठीण लढाई झाली ज्यात अश्रद्धावंत- अन्यायी कुरैश आणि मुस्लिम यांच्यात खडतर रक्तरंजित युद्ध झाले. आणि मुस्लिमांना त्या जबरदस्त विजयाचे आशीर्वाद मिळाले, त्यानंतर इस्लामचा आदर आणि सन्मानाचा ध्वज इतका उंच झाला की अश्रद्धावंत- अन्यायी कुरैशांचा सन्मान आणि वैभव पूर्णपणे नष्ट झाले.
कुरआन मध्ये या लढाईचा उल्लेख आला.
अल्लाह तआलाने जंगे बद्रच्या दिवसाला ‘यौमुल फुरकान’ असे नाव दिले. कुराणातील सुरा-ए-अन्फाल आणि इतर सूरांमध्ये या युद्धाचा वारंवार तपशीलवार उल्लेख आहे. या युद्धातील मुस्लिमांच्या विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, सर्वशक्तिमान अल्लाहने कुराणमध्ये म्हटले आहे की: –
“आणि निःसंशयपणे अल्लाहने बद्रमध्ये तुमची मदत केली जेव्हा तुम्ही दुर्बल आणि निराधार होता. त्यामुळे तुम्ही लोक अल्लाहचे भय बाळगा जेणेकरून तुम्हाला आशीर्वाद मिळावा!”
अल्लाहच तो आहे जो नकारत्मक परिस्थिती बदलू शकेल हि श्रद्धा तुम्हाला अधिक बलवान बनवते.
मक्कावासिय पुरोहित वर्गाला शस्त्राच्या घोड्याच्या आधारे अरब जगतात मुस्लिमांना हरवून त्यांच्या श्रद्धाना आणि निष्ठांना तडा लावायचा होता. कुरेशींना मुस्लिमांना नामोहरण करून त्यांच्या मनात भीती निर्माण करावयाची होती. आणि मदिना पासून मक्कापर्यत ज्यांनी पुरोहितशाहीला, सरंजामशाहीला,मूर्तीच्या देवपूजेला नाकारून इस्लाम स्वीकारला होता. हे कुरैशचे नेतृत्व करणारे पुरोहित संख्येने जास्त होते.
दुसरीकडे अल्लाहवर तवक्कुल असणारे मुस्लिम झालेले कुरैश होते. त्यांच्या समोर लढण्यासाठी त्यांचे आप्तस्वकीयच होते. त्यांना सत्य आणि असत्याची ओळख होती. आणि त्यांच्या वैचारिक वारस असलेल्या पैगंबराच्या आदेशाने त्यांची लढण्याची इच्छा समोर पुरोहितांपैकी असलेले आपलेच रक्ताचे भाऊ बांध आहेत म्हणून बदलणारी नव्हती.
या लढाईत सगळे पैगंबरांच्या आदेशाने एका ओळीत उभे राहिले होते. ज्यांना पैगंबरांनी नेता म्हणून निवडले त्याच्या निवडीवर कोणतंही आक्षेप न घेता सगळे लढले.
बद्रच्या लढाईने मुस्लिमांना प्रतिष्ठा मिळवून दिली. या लढाईने हे निश्चित केले कि अल्लाह तुमच्यासाठी चांगली योजना करू शकतो. हि लढाई मुस्लिमांनी सदैव एकजूट राहिले पाहिजे. ज्यावेळी तुम्ही एकजूट राहता तेव्हा समोर असलेली शस्त्रे तुमचा निश्चय डळमळीत करू शकत नाही हे दर्शवते.
बद्रच्या लढाईने हे सिद्ध केले कि कधीही एकच नेता असावा. ज्यावेळी प्रत्येकाला नेता व्हायचे असते त्यावेळी आपण अजारक समाजचे नेतृत्व करत असतो.
अल्लाह आणि आखिरत आपले ध्येय असले पाहिजे. नेहमी विपरीत परिस्थितीत अल्लाहकडे दुआ केली पाहिजे.
हि लढाई तुम्हांला हे शिकवते कि तुम्ही परोपकारी झाले पाहिजे.
या लढाईत सुमारे 14 मुस्लिम शहीद झाले, तर या लढाईत एकूण मुस्लिमांची संख्या 313 ते 317 असल्याचं सांगण्यात येत आहे. या युद्धात मुस्लिम मक्केतील सुमारे 1000 कुरैशांशी लढले. या युद्धात कुरैश नेता अबू जहल मारला गेला. अरब प्रथेनुसार कुरैशच्या तीन सरदार शैबा, उतबा आणि वलीद बिन उबा यांनी तीन मुस्लिम सेनापतींना युद्धाचे आव्हान दिले आणि हे आव्हान ओबेदाह, हमजा आणि अली रझी यांनी स्वीकारले. कबूल केले. इमानवंत कुरैश नेते धैर्याने लढले आणि शत्रू पराभूत झाला आणि मारला गेला.
चौदा मुस्लिम शहीद झाले तर विरोधकांचे 70 मारले गेले.यातील तेरहा युद्धाच्या जागी शहीद झाले तर एक जखमी असलेले सहाबी रस्त्यात जाताना शहीद झाले.
जे चौदा मुस्लिम शहीद झाले त्यांची नावे खालील प्रमाणे.

- उमैर बिन अबी वक़्क़ास अल मुहाजिरी رضی اللّٰہ عنہ
- सफवान बिन वहब अल मुहाजिरी رضی اللّٰہ عنہ
- जुश्शिमालैन इब्न अब्दी अम्र अल मुहाजिरी رضی اللّٰہ عنہ
- मिहजा बिन सालेह अल मुहाजिरी رضی اللّٰہ عنہ
- आक़िल बिन अल बुकैर अल मुहाजिरी رضی اللّٰہ عنہ
- उबैदा बिन अल हारिस अल मुहाजिरी رضی اللّٰہ عنہ
- सआद बिन खैसमा अल औसी رضی اللّٰہ عنہ
- मुबश्शिर बिन अब्दुल मुन्ज़िर अल औसी رضی اللّٰہ عنہ
- हरीसा बिन सुराक़ा अल खज़रजी رضی اللّٰہ عنہ
- राफी बिन अल मुअल्ला अल खज़रजी رضی اللّٰہ عنہ
- उमैर बिन अल हुमाम अल खज़रजी رضی اللّٰہ عنہ
12.यज़ीद बिन अल हारिस बिन फुसहम अल खज़रजी رضی اللّٰہ عنہ
13.मुआविज़ बिन अल हारिस अल खज़रजी رضی اللّٰہ عنہ
- औफ बिन अल हरीस अल खज़रजीرضی اللہ عنہ
या युद्धात शत्रूंचे 70 सैनिक मारले गेले त्यात
हनजला बिन अबू सुफियान ,अबु उबैदा बिन सईद, नोफल (शैतान ए क़ुरैश), उमैर बिन उस्मान, अब्दुल्ला बिन मंजर , आस बिन मुनब्बा ,अबुल आस बिन कैस यांसारखे महत्वाचे नेते मारले गेले.हजरत अली यांचे शौर्य अतुलनीय असे होते .
विश्वातील पहिली घटना अशी होती की थोडक्यात युद्ध कैद्यांसाठी मानवी हक्काचा जाहीरनामा होता

लढाईत सापडलेल्या 70 कैद्यांना फाशी न देता त्यांच्याकडून दंड वसुल करावा असा निर्णय घेण्यात आला.इस्लामिक अभ्यासका मते, इस्लामच्या प्रेषितांनी 4000 दिरहमच्या मोबदल्यात युद्धकैद्यांना मुक्त केले. याशिवाय सर्व कैद्यांना आदराची वागणूक दिली जात होती आणि त्यांना खायला अन्न आणि घालण्यासाठी कपडे दिले जात होते. अनेक सुशिक्षित कैद्यांना असेही सांगण्यात आले की त्यांनी 10 मुस्लिम मुलांना लिहायला आणि वाचायला शिकवल्यास त्यांची शिक्षा माफ होईल त्यांना मुक्त केले जाईल. ज्ञानाच्या बदल्यात शिक्षा माफ करणे हि विश्वातील पहिली घटना अशी होती की थोडक्यात युद्ध कैद्यांसाठी मानवी हक्काचा जाहीरनामा होता.त्याचा परिणाम हा झाला कि मुस्लिमांच्या परोपकारपणामुळे दोघे सोडून सर्व कैद्यामध्ये इस्लामसाठी झरा वाहू लागला व ते मुस्लिम झाले.
तुमची तयारी कितीही असली तरी तुम्ही त्या तयारीवर विश्वास न ठेवता अल्लाह प्रती तवक्कुल वर ठाम रहा.ज्यावेळी तुमच्याठायी हे असते तेव्हा तुम्ही हरला तरी तुम्ही विजयी असता.
इस्लाम मध्ये झालेल्या सुरवातीच्या लढाईचा उल्लेख करून हा युक्तिवाद केला जातो की इस्लाम तलवारीच्या साहाय्याने पसरला किंवा युद्धाचे चुकीचे दाखले दिले जातात. इस्लामच्या महत्वाच्या लढायात सुरवातीला समोरून हल्ला झाला आणि त्याचा बचाव व प्रतिकार मुस्लिमांनी केला यातून युद्ध झाले. बद्रची लढाई देखील अशीच लढाई होती.
रमजानच्या उपासाच्या काळात झालेली हि लढाई तुम्हाला प्रेरणा देते कि कठीण परिस्थितीत, उपाशी, अन्न पाण्याविना निर्माण झालेली परिस्थितीत तुमचा विश्वास डळमळीत करू शकत नाही यामुळे 313 च्या आसपास असणारे इमानधारकांनी हजारांच्या संख्येत असलेल्या पुरोहितशाहीला आव्हान दिले.
जंग ए बद्र बाबत सखोल व सुलभ माहिती.👌
धन्यवाद मराठी मुसलमान 💐