मुस्लिम समाजाने सुद्धा भावनाविवश मनाने राजकारण करण्याऐवेजी बौद्धिक बळाचा वापर करण्याची गरज आहे.

मुस्लिम समाजाची वोट बँक आहे?
खरं तर हा प्रश्न विचारावासा वाटला कारण भाजपा आणि संघवाद्यांनी राजकारणात प्रवेश करताना विरोधकांवर आरोप लावताना अल्पसंख्याक किंवा मुस्लिम लालुलचांगुन आरोप लावताना मुस्लिम वोट बँक नेहमी चर्चेत मुद्दा आणला. एकीकडे भाजपा सारख्या पक्षांनी बहुसंख्यांक राजनीती पुढे मुस्लिम मताची गरज नाही किंवा मुस्लिमांना दुय्यम नागरिक म्हणून एक वातावरण तयार करून जेवढे मुस्लिमांना राजकीय दृष्ट्या खच्ची केले नसेल इतके मुस्लिमांचे ज्यांना मसिहा म्हंटले जाते त्यांची स्थिती तीच आहे.

उत्तरप्रदेश मध्ये काशिराम यांच्या बहुजन राजकीय कारकिर्दीला टेकू दिला तो मुस्लिमांनी. सत्ताही मिळवली त्यांनी भाजपाच्या मदतीने. एकेकाळी आंबेडकरी पक्षांना आपला नैसर्गीक मित्र म्हणून मुस्लिमांनी साथ दिली. शिव – भीम शक्तीच्या नावाने आठवले यांचा प्रवास कधी शिवसेना पक्षाकडून भाजपाच्या हिंदुत्वाच्या मांडीवर बाळसे धरू लागला वेगळे सांगायला नको. याचा परिणाम असा झाला आंबेडकरी समुदयापासून मुस्लिमांच्या बरोबरीने असणारा मातंग – चांभार इ समुदाय हिंदुत्वाची भाषा बोलू लागला. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर देखील म्हणतात की ‘ भाजपा जात सोडायला तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत. मंग प्रश्न पडतो की आंबेडकर वंचीतांची लढाई लढत आहेत की स्वतः च्या फायद्याची. त्यांना AIMIM शी युती करणे अवघड जाते त्यांना नाही इतरांना देखील कारण ते महादेव जानकर प्रमाणे स्वतःचे मालक आहेत.

आज भाजपाच्या मांडीवर बसलेले कित्येक नेते हर्षवर्धन पाटील, उदयनराजे, अशोक चव्हाण हि यादी मोठी असेल जे मुस्लिमांच्या मतावर मोठे झाले होते ज्यांच्याशी मुस्लिम मते नेहमी एकनिष्ठ होती.

जेव्हापासून राजकारण समजते आहे तेव्हापासून आमच्या ओळखीच्या पाहुण्याचे जवळजवळ दिडशे मतदान नेहमी स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीवर कोणतीही बर्गेनिग न करता राष्ट्रवादी पक्षाला जात होते तेही नेहमी गृहीत धरत.

महादेव जानकर सारखा माणूस भाजपसाठी उपद्रव्य का ठरू शकतो? पडळकर, डॉ महात्मे, प्रा शिंदे आणि अन्य पक्षातील धनगर समाजातील नेते भाजपला उपद्रवी का वाटले नसावे? जानकर यांना का महत्व दिले गेलेले असावे. कारण इतर नेते इतर पक्षाच्या दावणीला बांधले आहेत जानकर एका पक्षाचे मालक आहेत बाकी शिपाई आहेत. कित्येक दिवस भाजपा सोबत राहणारे जानकर माढा मुस्लिम समाजाला देखील तुतारी म्हंटल्यावर हक्काचे वाटू लागले होते.

CAA,NRC याच्या समर्थनार्थ झालेली आंदोलने, मुस्लिमांना डीवचण्याचे ज्या ज्या वेळी प्रकार झाले तेव्हा तेव्हा हि मंडळी कुठे होती?भाजपा सारख्या पक्षाचा त्रास फक्त मुस्लिमांनाच आहे का? नाही, येथील शेतकरी,कामगार, विद्यार्थी या सर्वांनाच आहे. केजरीवाल सर, सिसोदिया सर, जैन सर आणि सिंग सर यांनी गुन्हा केला नसेल तर त्यांना काहीही होणार नाही. यांनी देखील देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे ज्याप्रमाणे ‘बा इज्जत बारी’ या पुस्तकात ज्या लोकांच्या कथा आहेत त्याप्रमाणे, मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या मुस्लिमांवर अन्याय झाला त्यांनी , मेरठमधील हाशिमपुरातील लोकांनी विश्वास ठेवला, 84 च्या पीडितांनी विश्वास ठेवला, 1992 च्या घोटाळ्यात भागधारकांनी विश्वास ठेवला,2002 मध्ये बिल्किस बानोने, मुझफ्फरनगरच्या जनतेने 2014 मध्ये विश्वास ठेवला, 2020 मध्ये तुरुंगात गेलेले काही बांधव आजही विश्वास ठेवत आहेत.

या सर्वांचे जाऊद्या याचा त्रास मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री अश्वनी चौबे यांना कॅमेऱ्यावर रडताना तुम्ही पाहिले आहे का? तसेच रमेश विधुरी, परवेश वर्मा, प्रज्ञा ठाकूर, वरुण गांधी, व्ही.के. सिंग, जयंत सिन्हा, अनंत हेगडे इत्यादी लोक खोलीत रडत असतील.
यांच्यापैकी कुणी मुस्लिमांचे हात कापत होते, कुणी मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार घालत होते, कुणी संसदेत मुस्लिमांना शिव्या देत होते, कुणी मुस्लिमांना दर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानात पाठवत होते आणि कुणी मॉब लिंचिंगच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांना हार घालत होते. आज त्यांची परिस्थिती काय आहे? वापरा आणि फेकून द्या. कदाचित हा मुस्लिम समुदायाचा संयम असेल.कदाचित उद्या कोकणातील राणे यांची देखील हिच गत असेल.

एकीकडे जेलवारी वाचवण्यासाठी भाजपा सोबत गेलेले “मुस्लिमांनी घाबरण्याचे कारण नाही मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील म्हणणारे अजितदादा उद्या एखाद्या मुस्लिम विरोधी कायद्याचे संसदेत तेवढ्या जोरकसपणे विरोध करतील का? संसदेत अशा कायद्यांचा विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळे उद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने बाहेरून पाठिंबा दिल्यावर कोणती भूमिका घेतील?

मुस्लिमांची मते सर्वांना गृहीत वाटतात. पण प्रश्नाचे काय? मुस्लिमांची वोट बँक प्रत्येकाने आपल्या आपल्याकडे वळवून घेतली आहे. 2024 च्या निवडणुकीला भाजपाला मुस्लिमांच्या मताचा टक्का वाढण्याची शक्यता सध्याच्या गोंधळाच्या वातावरणात निर्माण झाली आहे. तुम्ही म्हणाल कसे? मुस्लिम बहुल भागात बाबा सिद्दीकी, नवाब मलिक अजितदादा गटाचे दिसतात पण ते भाजपाच्या व्यवस्थेला मदत करतात. अशी परिस्थिती फक्त महाराष्ट्रात नाही प्रत्येक राज्यात आहे. मुस्लिम समाजाची स्वतःची अशी एकत्रित राजकीय परिणाम करू शकेल अशी वोट बँक नाही.

महाराष्ट्रातून गेल्या वेळी इम्तियाज जलील खासदार म्हणून गेले कित्येक वर्षानी पहिल्यांदा एक मुस्लिम चेहरा महाराष्ट्रातून गेला पण यंदा हि परिस्थिती वाटते तितकी सोप्पी नाही.

ज्या ठिकाणी मुस्लिम मतदान 52% आहे तिथे एखादा धर्मनिरपेक्ष मुस्लिम नसलेला उमेदवार निवडून येतो. उदा. आझमगढ , बरेली, देवबंद पण मुस्लिम येऊ शकत नाही कारण मुस्लिमांची स्वतःची अशी वोट बँक अस्तित्वातच नाही जी बार्गेनिंग करू शकेल.मुस्लिम समाजाने सुद्धा भावनाविवश मनाने राजकारण करण्याऐवेजी बौद्धिक बळाचा वापर करण्याची गरज आहे. जेणेकरून मुस्लिम समाजाची असुरक्षितेची भावना नष्ट होईल व हा समाज देशाच्या मुख्य प्रवाहात सामिल होवू शकेल

2 thoughts on “मुस्लिम समाजाने सुद्धा भावनाविवश मनाने राजकारण करण्याऐवेजी बौद्धिक बळाचा वापर करण्याची गरज आहे.

  1. खूपच छान लेख लिहला आहे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे
    तुम्ही खूप चांगले मुद्दे घेता एक you tube channel का काढत नाही press च्या माध्यमातून

    कारण
    आज समाजाला एक न्यूज चॅनलची गरज आहे ज्या आपल्या बातम्या आपल्या लोकांन पर्यंत पोहचण्याची
    प्रयत्न करा अल्लाह तुम्हाला जरूर यश देईन
    व आम्ही तुम्हाला साथ देऊ या सर्व गोष्टी साठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *