
इस्लाम मदिनामध्ये एका वेगळ्या उंचीवर होता.पैगंबर व त्यांचे सोबती मस्जिदमध्ये नमाज अदा करत असताना एक मनुष्य आला ज्याला इस्लामबाबत चीड होती व मुस्लिमांबद्दल द्वेष. तो मस्जिदच्या मधोमध मुतला .हे दृश्य पाहून पैगंबरांचे सोबती त्या माणसाला मारण्यासाठी धावले. तो मनुष्य एवढा घाबरला की आता त्याला जीवाची भीती वाटू लागली.
पैगंबरांनी त्या सोबत्यांना इशारा केला आणि त्याला मारण्यापासून रोखले आणि मस्जिदमध्ये दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीला जवळ बोलावले. जे सोबती त्याला मारायला धावले होते त्यांना पाणी आणून ती जागा स्वच्छ करायला सांगितली.
त्याची बांबेरी उडाली. पैगंबर त्याला म्हणाले मस्जिदमध्ये अल्लाहची उपासना केली जाते जो सर्वशक्तिमान आहे. आम्ही येथे नमाज पडतो, दुआ करतो या नंतर तू असे दुष्कृत्य करू नको. व त्याला जायला सांगितले.
तो व्यक्ती मागे वळून पाहत पाहत भीतीने आपल्या लोकांजवळ गेला. त्याला पैगंबरांनी दिलेल्या वागणुकीचे आश्चर्य वाटले. ज्या कुरैश , अरबस्तानच्या वाळवंटात उच्च निच भेदभाव पाळला जात होता. मंदिरात दुसऱ्याने आधी उपासना करणे या मानपानासाठी रक्तपात घडत होते तेथे पैगंबर यांच्या नवीन धर्माने त्याच्या मनाला साद घातली.
त्याने आपल्या लोकांना जाहीर सांगितले,” तुम्ही खोटे आहात. मोहंमद स.स. यांस जादूगार म्हणता, बापजाद्यांचा धर्म सोडणारा म्हणून खोटा म्हणता तो सत्य आहे आणि त्याचा धर्म हा अधर्म नाही.”
आणि दुसऱ्या दिवशी त्याने पैगाबरांजवळ जाऊन इस्लाम कबूल केला आणि त्यांचा मरेपर्यंत सोबती झाला.
ज्या व्यक्तीने बाबरीवर कुदाळ चालवली तो बलवीर सिंह आणि योगेंद्र पाल यांनी पश्र्चातापाने इस्लाम स्वीकारला आणि आपल्या आयुष्यात शंभरपेक्षा जास्त मस्जिद बांधल्या. आयोध्यात नियोजित जागी मस्जिद बांधण्यास मुसलमान का उत्साही नाहीत याचे उत्तर यात मिळेल कारण अल्लाह उत्कृष्ठ नियोजन कर्ता आहे.
इतके होऊन मुस्लिम समाज का शांत आहे याचं उत्तर पैगंबर यांनी जो आदर्श घालून दिला त्यात आहे.
खालील दृश्य काल जाळपोळ गजापुर येथील मस्जिदचे आहेत. हैद्राबादचे सलमानभाई आणि तेथील स्थानिकांनी आज मस्जिद दुरूस्त करून पुन्हा सुरू केली.