मुंबईत मराठी मुस्लिमांनी काढलेल्या तिरंगा यात्रेचा अर्थ..

मुस्लिमांना तूम्ही सोयी सुविधा देऊ नका गेल्या सत्तर वर्षात मुस्लिमांची स्थिती पाहता ‘ आम्हाला राजकीय वाटा द्या, आम्हाला आर्थिक वाटा द्या!’ म्हणत मुस्लिम समाज केव्हाही एक झाला नाही. जगाच्या पाठीवर असलेला मुसलमान तो शिया, सुन्नी, तब्लिक यात विभागलेला असला, तो धार्मिक गोष्टीचे पालन करत नसला तरी त्यांचे जगाचे अंतिम प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावर जे प्रेम आहे त्याला सीमा नाही. हजारो मोबलींचींग करून, दंगली घडवून, मुस्लिमांच्या घरावर बुलडोझर चालवून येथील मुसलमान पाहिजे तेवढा आक्रमक होत नाही. तेव्हा मुस्लिमांच्या पैगबरांवर टीका करण्यासाठी अपमान जनक वक्तव्य करण्यासाठी केंद्रात नुपूर शर्मा व राज्यात रामगिरी महाराज याचा वापर केला गेला .

महाराष्ट्रात मराठी भाषेत किंवा वारकरी संप्रदायातील कोणत्याही व्यक्तीने कधीही अशा प्रकारे वक्तव्य केले नव्हते. सुफी संप्रदाय व भक्ति संप्रदाय एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या वैचारिक देवाणघेवाण करत वाढलेले.एकीकडे नितेश राणे याची राजकीय व्यासपीठावरून मुस्लिम समाजाबद्दल द्वेष पूर्ण वक्तव्य तर दुसरीकडे सोशल मीडियात केला जाणारा विखारी प्रचार. घटनात्मक पदावर बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रामगिरी महाराजाचे व्यासपीठावरून जाहीर समर्थन करतात हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारे आहे.

काल मुस्लिमांची मुंबईतील निघालेली पदयात्रा AIMIM पक्षाचे इम्तियाज जलील यांच्या पुढाकाराने झालेले असली तरी ती एकाच राजकीय पक्षाची नक्कीच नव्हती. लिंचींग, रेल्वेसारख्या सार्वजनिक ठिकाणी द्वेषाचा सामना, राजकीय पक्षाकडून केले जाणारे जाणून बुजून दुर्लक्ष याविरोधात ती यात्रा सामान्य मुस्लिमांचा दबून राहिलेला आवाज होता. या यात्रेत कुठेही गालबोट लागेल असा प्रकार घडला नाही कोणतेही पक्के नियोजन नसताना मुस्लिमांनी रझा अकादमीच्या मोर्चात जी बदनामी केली गेली त्याची पुनरावृत्ती होऊन दिली नाही. तिरंगा यात्रेतून परतताना काही ठिकाणी मुस्लिम गाड्यांवर हल्ले झाले, गर्दीला उचकवण्याचा प्रयत्न झाला तरी मुस्लिम युवकांनी दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे.

काल नितेश राणेंनी मोर्चावर प्रतिक्रिया देताना ‘ आम्ही देखील मुंबईत हिंदूची गर्दी जमवू शकतो’ हि दिलेली प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. हि गर्दी दाखवून बलात्कारी अक्षय शिंदेचा पद्धतशीर न्याय प्रक्रिया न राबवता शिक्षा देऊन टाकली गेली.लोकसभेला मुंबई भाजपाच्या ताब्यातून गेलेली आहे. लोकसभेला हिंदू – मुस्लिम अजेंडा करता आला नाही तो विधानसभेला करून काही प्रमाणात स्वतःच अस्तित्व राखण क्रमप्राप्त ठरणार आहे कारण भाजपाच्या महाराष्ट्रात किमान 50 जागा येण्याची शक्यता नाही हा सर्वे सांगतो. त्यातली त्यात देशाची आर्थिक राजधानी देशातील सत्ताधारी पक्षाच्या हातातून जाणे हे भविष्यातील लोकसभेला मारक आहे.

मुंबईच्या मुस्लिमांच्या गर्दीवर राजकीय अजेंडा वापरण्यासाठी क्रिया – प्रतिक्रिया येणारच. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हि कोणत्याही राजकीय पक्षाची यात्रा नाही हे जाहीर केलेले असले आणि त्यात सत्यता असली तरी लोकसभेला AIMIM ची मतांची कमी झालेली टक्केवारी, पिछाडीवर गेलेला पक्ष या पार्श्वभूमीवर ही तिरंगा यात्रा AIMIM पक्षात आत्मविश्वास निर्माण करणारी आहे.

सगळ्यात ह्या तिरंगा यात्रेच वैशिष्ट्य या यात्रेत पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मराठी मुस्लिमांनी आपल शक्तिप्रदर्शन घडवून आणल कारण मुंबईकडे आपल्या न्याय हक्कासाठी जावं हे पहिल्यांदा मराठी मुस्लिमांच्या ठिकाणी भावना दिसून आली.रझा अकादमीच्या नेतृत्वात झालेल्या मोर्चातील गैर प्रकाराला राज ठाकरे यांनी शक्तिप्रदर्शन करून उत्तर दिले आता राज ठाकरे यांची जागा नितेश राणे भरून काढतील. नितेश राणेंच्या रूपाने त्यांना मिळणारी खुली सुट हि सत्ताधारी पुरस्कृत अशीच आहे.

येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या समोर मुस्लिम प्रतिनिधित्व, मुस्लिम प्रश्न हा सगळ्यात मोठा अडचणीचा विषय असणार आहे कारण महाराष्ट्रातील मराठी मुसलमान हा स्वतःच्या न्याय- हक्कासाठी वाटा मागू लागला आहे.

भाजपाच्या पुढे मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटील हे गळ्यातील हाडुक होऊन बसले आहे तर ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण हा विषय भाजपाच्या अडचणीचा होऊन बसणार आहे. एकीकडे हिंदू – मुस्लिम वाद, जाती जातीतील वाद, OBC – मराठा वाद या सर्वांच्या मुळाशी कोणते राजकारण दडले आहे हे महाराष्ट्रातील सुज्ञ वर्ग नक्की जाणतो.

मराठा क्रांती मोर्चा मुंबईत येऊ न देणाऱ्याने मुस्लिमांचा मोर्चा मुंबईत येऊ कसा दिला हा प्रश्न आहे? स्वतःच्या फायद्यासाठी येणाऱ्या विधानसभा ह्या बेरोजगार, महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग धंदे, कायदा सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हिंदू – मुस्लिम या मुद्द्यावर निवडणुका व्हाव्यात असे वाटणाऱ्यांना कालच्या मोर्चाला मुस्लिम नसलेल्यांनी म्हणजे बहुसंख्य हिंदूंनी दिलेला पाठिंबा आणि तिरंगा यात्रेहून परतणाऱ्या गाड्यांवर काही ठिकाणी हल्ले झाले तरी आलेल्या गर्दीने आतातायीपणा न करता शांत राहिले. हि गोष्ट हिंदू मुस्लिम करणाऱ्यांचे मनसुबे उधळणारी आहे.

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील मराठी मुसलमान या स्वरुपात कधीही स्वतःच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये एकवटला नव्हता तो या निमित्ताने एक झाला.

13 thoughts on “मुंबईत मराठी मुस्लिमांनी काढलेल्या तिरंगा यात्रेचा अर्थ..

  1. सुरवात यशस्वी. मांडणी आणि रैलीचा नैरेटिव अजून इफेक्टीव हवा.

  2. Ha lekg khup cagla lihila aahe ya aartical mule lokana samshya samjhun genya sathi soyichee aahe aani tyavar mat kase karta yeyil te pan samjel ya aartical mule

  3. Allah मुसलमानो मे और हमारे हम वतन भाइयों मे एकता के मज़बूत करे

  4. अति उत्तम मोर्चा होता पण म्हणावं तसे इफेक्ट या मोर्चा ने झालं अस मला वाटत नाही मी एकच बोलणे जे कोणी अंगा वर येईल त्याला शिंगावर ग्या कोणी पण उठतो उपट संडू आणि मुस्लिम समाज वर टीका करतो हे अस किती दिवस चालेल काय माहित नाही पण या नंतर मुस्लिम समाज ने संविधान कायदा मार्फत प्रोटेस्ट आंदोलन मोर्चा परतेक वेळा करायला पाहिजे

  5. ही रॅली हक्क मागणी रॅली होती, नी मागणी ची, हक्क घेण्याची ही असू शकते.
    .
    आपले लेखान सत्य नी मन व्याकूळ लेखाण..
    धन्यवाद
    जय शिवराय
    जय भारत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *