महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या दलित आणि मुस्लिम मिळून भाजपाला देणार का?

महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार का?

१-रामगीरी महाराज याने केलेली पैगंबरांबाबत वक्तव्ये
२- पुसेसावळी, गझापुर येथील दंगली.
३- शेकडो ठिकाणी गो रक्षांच्या नावाने मुस्लिमांवर झालेले हल्ले.
४- ट्रेनमध्ये मुस्लिम म्हणून एका SRF जवानाने जय श्रीरामचे नारे देत तीन मुस्लिमांना घातलेल्या गोळ्या.
५- महाराष्ट्रात १५-२० ठिकाणी दर्ग्यावर झालेली अतिक्रमणे आणि हिंदू देवस्थान म्हणून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न
६- अहमदनगर सारख्या जिल्ह्यात उंबरे सारखे घडलेले प्रकरण.
७- मुस्लिम म्हणून होणारे आर्थिक, सामाजिक बहिष्कार .
८- मिरा भाईंदर, पुणे सारख्या ठिकाणी बुलडोझर सारखे तंत्र वापरले गेले
९- मोहसीन शेख ते नुरूल हसन ज्या निष्पाप तरुणांना प्राण गमवावे लागले.
१०- भाजपचे आमदार नितेश राणे मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाषा करतो.
११- शेकडो धर्मांध झुंडीना पोसणारे भिडे एकलबोटे यांना अभय दिले जाते.
१२- मुस्लिम नावे मतदार यादीतून वगळण्याचे, आर्थिक बहिष्कार घालण्याचे ठराव पास केले जातात.
१३- सोशल मीडियात पेड लोकांच्याद्वारे मुस्लिम धर्म, महापुरुष यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर पसरवले जातात.

इतक्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना मुस्लिम आणि दलित समाज सत्तेच्या चाव्या भाजपच्या ताब्यात देणार का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी ८२७२ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, १०९०० अर्ज दाखल झाले होते.
कधी नव्हे ते इतके उमेदवार निवडणुकीला उभे केले गेलेले आहेत.

महायुती. महाविकास आघाडी

भाजपा १४८. काँग्रेस. १०१
एकनाथ शिंदे ८५. शिवसेना उद्धव ९६
अजितदादा राष्ट्रवादी ५१. शरद पवार ८७
मित्रपक्ष ४. मित्रपक्ष ४

उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. सद्यस्थितीनुसार राज्यातील २८८ पैकी ३२ जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होईल, असे चित्र आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल ४९ विधानसभा मतदारसंघांत शिवसेना वि. शिवसेना असा सामना होणार आहे.

बाकी लढती भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात आहेत. शिंदे गट आणि अजित दादा गट यांच्यावर लोकांचा रोष हा भरमसाठ निवडणुका आगोदर वाटलेले निधी व योजनांचा पाऊस यात लोकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या वेळी भाजपाने १२२ जागा लढवल्या होत्या त्यात १०५ जागांवर विजय प्राप्त केला होता. भाजपाच्या विरोधात असलेले व विजेते झालेले शिवसेना ५६ व राष्ट्रवादी ५४ मधील कित्येक उमेदवार अजितपवार गट व शिंदे सेना यांचे निवडून आलेले उमेदवार यंदा भाजपाच्या युतीत आहेत. याचा फायदा भाजपाला होणारा आहे .

भाजपाने राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई केलेली आहे.
तसेच जरांगे पाटील यांचा फॅक्टर मोडीत काढण्यासाठी मराठा उमेदवार मराठवाड्यातून सतरा इतके दिलेले आहेत. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात अजित दादा गटाबरोबर असलेले मराठा उमेदवार मैदानात आहेत. ह्या जातीय समीकरणा चा मराठा समाज भाजपाला फायदा करून देणार?

अजितदादा गटातील काही उमेदवारीचा फायदा भाजपाला होईल?

नवाब मलिक, जिशान सिद्दिकी, सना मलिक, मुबीन मुल्ला, नवाब मुश्रीफ हे मुस्लिम उमेदवार अजितदादा गटाला बरोबरच भाजपाला सत्तेच्या चाव्या मुंबईतून देण्याचा प्रयत्न करतील कारण मुंबईमधील मुस्लिम समाज लोकसभेला भाजपाच्या विरोधात मतदान करायचे म्हणून परंपरागत विरोधक असणाऱ्या शिवसेनेला एक जुटीने मतदान करून लोकसभेला ताकद दिली होती. अजित दादा गटातील हे उमेदवार बाकी ठिकाणी भाजपा उमेदवार जिंकून येण्यासाठी मदत करतील!

यंदा भाजपकडे जागा जास्त आहेत. शिवाय मित्रपक्षांचे उमेदवार. हरियाणामध्ये दलित समाजाने सत्तेच्या चाव्या भाजपाकडे दिल्या त्यांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात दलित मुस्लिम करणार का?

हरियाणा मध्ये महाराष्ट्रापेक्षा भाजपा सरकार विरोधात शेतकरी आंदोलनामुळे रोष होता. या आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने केलेले घाव याच्या जखमा ताज्या होत्या पण हरियाणामध्ये भाजपा सत्तेत कशी आली? दलित समाजाच्या मतविभागणीचा फायदा भाजपाला झाला. या समाजाची मते भाजपाच्या पारड्यात गेली.

भाजपाचा मतदार हा एकदम पक्का असतो. भाजपाला ठराविक मतदान हे फिक्स असते. कमी जास्त होणारा मतदार हा भावनिक आधार, उमेदवार यांच्याकडे पाहून मतदान करत असतो. भाजपकडे RSS प्रणित यंत्रणा असते जी त्या भावनांचे मतात रूपांतरण करते.

महाविकास आघाडीबाबत लोकप्रतिनिधित्व या मुद्द्यावर दलित आणि मुस्लिम यांच्यामध्ये प्रचंड रोष आहे सगळ्यात जास्त मुस्लिम समाजामध्ये. याचा फायदा भाजपाच्या माथ्यावर नक्की पडेल. शिवाय मुंबईमध्ये कधी नव्हे ती शिवसेना पक्षाला पडणारी मुस्लिमांची एक गठ्ठा पडनारी मते शिवसेना (उबाठा) ला पडलेले होती.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाने दिलेले चार मुस्लिम उमेदवार हे १००% निवडून येतील पण त्याचा परिणाम इतर भागात भाजपाच्या पथ्यात पडणारा असेल का?

ग्रामीण भागात बहुसंख्य ठिकाणी अजितदादा गटाचे उमेदवार हे मुस्लिमांच्यासाठी योग्य आहेत पण त्यांच्या पाठिंब्याने सत्तेत येणारे भाजपा हि धार्मिक द्वेष निर्माण करणारी असेल? त्यांच काय?

मुळात सगळ्यात जास्त जागा लढवणारा भाजपा पक्ष १४८ जागांपैकी १०० जागांवर जरी थांबला तरी निवडून येणारे अपक्ष, अजितदादा पवार गट, शिंदे सेना ह्याचे निवडून येणारे आमदार भाजपाला सत्तेच्या चाव्या देणारे असतील?

मुस्लिम मतांची विभागणी करणारे प्रामुख्याने AIMIM, वंचित, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट , तसेच वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिलेले अपक्ष उमेदवार हे असतील का?

शिवाय ५४ ठिकाणी आरक्षित जागा आहेत तेथील लोक कोणती भूमिका घेतात ?

असदुद्दीन ओवैसी यांनी दलित आणि मुस्लिम व्होट बँकवर लक्ष असल्याचे दिसते. राज्यात ही महत्त्वाची व्होट बँक आहे. महाराष्ट्रात 13 टक्के दलित, तर 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या 14 उमेदवारांपैकी 11 मुस्लिम आणि तीन दलित उमेदवार आहेत. AIMIM ची लढत हि मुस्लिम बहुल भागात असल्याने त्यांची मतविभागणी भाजपाच्या पथ्यावर पडणारी नसेल. वंचितच्या 288 मतदारसंघातील उमेदवारीचा फायदा तोटा कुणाला होणार?

शिवाय मुस्लिमांच्या महाराष्ट्रात दलीत राजकारणा बाबतीत जे झालं तेच आता मुस्लिम राजकारणाचं देखील होत आहे. एक काळ असा होता की महाराष्ट्रात मुस्लिम नेते आणि नेतृत्व दोन्ही नव्हतं. आता मात्र इच्छुक नेते मंडळी, पक्ष आणि गट तटांची भाऊगर्दी झाली आहे. नेते ढिगाने आहेत पण नेतृत्व अजूनही नाही …

समाजवादी पक्ष, एम. आय. एम. , एस. डी. पी. आय. , राष्ट्रीय उलेमा काऊन्सिल , वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया , पिस पार्टी यादी मोठी आहे. सर्वांना त्याच 20-25 जागांवर लढायचं आहे जेथे मुस्लिम मतदारांची संख्या 20 ते 50 टाक्यांच्या आसपास आहे.

मालेगाव ची एक जागा सोडली तर महाराष्ट्रात फक्त मुस्लिम मतांच्या जोरावर कोणताही मुस्लिम उमेदवार सरळ लढतीमध्ये जिंकून येऊ शकत नाही. एकगठ्ठा मुस्लिम मतं जरी एखाद्या मुस्लिम उमेदवाराला पडली तरी त्याला जर-तर च्या शक्यतांवर आणि इतर उमेदवारांच्या मत विभाजनाच्या शक्यतांवर जास्त अवलंबून राहावं लागतं.

इतर समाज बांधवांसोबत समीकरणं जुळवल्याशिवाय शाश्वत मुस्लिम राजकारण उभं करणं अवघड आहे.

मुस्लिमांच्या समोर दोन प्रश्न आहेत एक विधानसभेत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व वाढवणे आणि दुसरे भाजपाच्या जातीय – धार्मिक द्वेष वाढवणाऱ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *